Subscribe:

Ads 468x60px

26 January 2012

हा तोच झेंडा आहे

हा तोच झेंडा आहे जो प्राप्त करण्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राण दिले .. अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले ..
आपले घर,संसार,आप्तस्वकीय सर्वांना डावलुन फक्त हा देश घडवण्यासाठी आणि हां तिरंगा अस्तित्वात आणण्यासाठी जीवन प्रवास रचला ...
आपले सैन्य आणि सुरक्षा दल आपले प्राण ह्या मातीसाठी देऊन आणि ह्या हरित भूमीला देश भक्तीचा लाल असा रक्त रंग देऊन ह्या तिरंग्याचा मान राखता ...

जन-गण-मन

आज आपल्या राष्ट्रगीतास १०० वर्षे पूर्ण झाले
सम्पूर्ण जन-गण-मन आपले राष्ट्रगीत

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे

24 January 2012

●๋•●๋• बूट फेक काव्य ●๋•●๋•

●๋•●๋• बूट फेक काव्य ●๋•●๋•

साहेब माफ़ करा मी बूट फेकून मारला
तुम्ही देश लुटता त्याचा तो राग धरला
तुम्ही तर प्रामणिक, आपले काम करता
दिवस रात्र एक करून, आपले बैंक खाते भरता
तुमचे ध्येय एकच आणि दिशा पण निश्चित
मते देता तुम्हा भरभरून सर्व अक्षिशित
माझी मती गेली जे मी भ्रष्ट झालो
दिड दमडीच्या नेत्यावर 'वूडलैंड' चा बूट फेकून आलो ...

23 January 2012

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म :- २३ जानेवारी १८९७, कटक
अदृष्य :- १८ ऑगस्ट १९४५, फोर्मोसा

२३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र बोस या महान क्रांतोसूर्याचा उदय झाला. जानकीनाथ व प्रभादेवी यांचे सुभाषचंद्र हे दैदिप्यमान अपत्य. लहानपणापासूनच प्रगल्भ असलेले सुभाषबाबू उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे आय. सी. एस. ची परीक्षा उच्चश्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना नोकरी मिळाली. पण त्या नोकरीमुळे त्यांना अस्वस्थता भासू लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. स्वातंत्र्याची तळमळ त्यांना लागलेली, त्यांनी गांधींची भेट घेतली. परंतू त्यांच्या धोरणामूळे सुभाषबाबूंचे समाधान झाले नाही. मग ते देशबंधु चित्तरंजन दास यांचे शिष्य झाले.

21 January 2012

क्रांतिकेतू रासबिहारी बोस

क्रांतिकेतू रासबिहारी बोस
जन्म :- २५ मे १८८६, पालाटबिधानी
निधन :- २१ जानेवारी १९४५, टोकियो

२३ डिसेंबर १९१२ ला दिल्लीच्या नवीन राजधानीत हत्तीवरून दिमाखाने प्रवेश करणारे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकण्याचा अभूतपूर्व पराक्रम करणारे महानायक म्हणजे राश बिहारी बोस.

रासबिहारी विनोदबिहारी बोस. हे बंगालच्या भद्र समाजातील सुपूत्र. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथील हेडक्लार्क रासबिहारी सर्व हिंदुस्थानात क्रांतिकार्याचे जाळे विणू लागले. ब्रिटिशांची गुप्त पोलिसी प्रबळ संघटना ही फक्त या एकाच क्रांतिकारकास पकडू शकली नाही. जपानमध्ये असतानाही त्यांच्यावर १९१५ साली पकडवॉरंट जारी करण्यात आले. परंतु जपान सरकारही त्यांना पकडू शकले नाही.

"मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे"

‎ "मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे"

मी विदर्भातील एक भारतीय शेतकरी ...जय जवान जय किसान मधला किसान ..
माझे नाव घेउन लोकांनी या देशावर राज्य केले ...
माझे फोटो काढून छायाचित्रकारान्नी पारितोषिके पटकवली ...
माझ्यासाठी असलेल्या पैश्यावर सरकारी बाबुंचे बंगले झाले ...
मला काही 'चेक' दिले गेले पण ते पण वटले नाही ...
आधुनिक महाराष्ट्रात मी मागील दशकात ५०,००० हुन अधिक वेळा आत्महत्या केली आहे ..
माझ्या परदेशी पाठवलेल्या मालाला जेव्हा नाकारले गेले आणि त्याची भरपाई आली ती कधीच माझ्या पर्यंत पोहोचू नाही दिली ...

19 January 2012

असा महाराणा प्रताप

१९ जानेवारी १५९७ रोजी महापराक्रमी असा महाराणा प्रताप यांचे राजधानी चावंड येथे मृत्यु.अकबराच्या काळात प्रत्येक हिन्दुच्या घोड्याच्या पाठीवर मुघलांच्या गुलामगिरिचे द्योतक म्हणुन तप्त लोहमुद्रा उठवली जात असे.बिन डागललेला घोड़ा आणि ताठ मानने वावरणारा हिन्दू फ़क्त राणा प्रतापच्याच राज्यात दिसत होता.सतत १४ वर्षे अकबराची सेना मेवाडमध्ये झगडत होती,मार खात होती आणि तिचे सेनापती आळीपाळीने बादशाहाकडे आपले काले ठिक्कर मुख मंडल दाखवण्यास जात होते.जून १५७६ च्या हलदी घाटीच्या

17 January 2012

'गणितानंद' कापरेकर

'गणितानंद' कापरेकर

१७ जानेवारी १९०५ ला डहाणूत जन्मलेले द. रा. कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. १९५२ पर्यंत त्यांनी देवळालीत शिक्षकी केली..

नोकरी निमित्ताने कंटाळवाणा रेल्वेप्रवास करताना तिकिटावरच्या संख्येशी खेळता-खेळता ‘डेम्लो’ संख्येच्या रूपाने त्यांच्या हाती घबाड लागले.

‘मूषक उड्डाण उपपत्री’ आणि ‘कापरेकर स्थिरांक’, ‘जादूचे चौरस’, ‘संयोग संख्या’, ‘वानरी संख्या’, ‘हस्तमघद संख्या’ अशा त्यांनी शोधलेल्या कितीतरी संख्या आहेत. अनेक लेख, पुस्तके लिहिणाऱ्या कापरेकरांना जगभरात मान्यता मिळाली.

03 January 2012

●๋•●๋• कविता - भिकारी ●๋•●๋•


ऐ निघ पुढे.. ऐकून मन टूटते ...
सारे जगच भिकारी पण माझी तुम्हाला लाज वाटते ...
जेव्हा काठी घालतो मला ट्राफिक पोलिस..
तेव्हा जिव फार होते माझा कासाविस...
मी तर मागुन प्रेमाने भिक स्वीकारतो रे ...
पडक्या दातावर हसू आणून आशीर्वाद देतो रे...
पण तो तर घेतो हिसकावून समोरच्याचा हक्क...
पैसे खावुन प्रामाणिक आहे दाखवतो चक्क ...
तो पण बाळगतो की माझ्या सारखीच लाचारी...
तो जनतेचा सेवक ठरतो आणि मी मात्र फक्त भिकारी ...

02 January 2012

माझे फेसबुक जीवन ...

मराठी पेजेस सध्या एका स्पर्धेतून चालले आहे .. ह्याला मागे टाकावे त्याला मागे टाकावे ..
रोज १५-१५ पोष्ट असता प्रत्येकाच्या..
मला तर ते शक्यच नाही कारण रोज पाहिली पोष्ट टाकतांना काय टाकावे हाच प्रश्न असतो ... लिहितो मग काहीतरी ...
पण काही असो विरोधक अथवा समर्थक ... जीव काढता सगळे बिचारे ...
पोस्ट चोरीला गेल्यावर होणारी चिडचिड मग मित्राला मेसेज पाठवून मन मोकळ करणे ...
द्वंद्व चालू असते सारखे ...
"बघ मी तुझ्या पेजला १० दिवसात मागे टाकतो अशी admin गर्जना ..."
प्रत्येक पेज चालकाच्या डझनभर फेक प्रोफाइल ...सर्व एक मोठा गोंधळ आहे ... आणि प्रेरणा दायी देखिल ..
कोण कोणावर लक्ष्य ठेवतो कुठल्या ग्रुप मधे जावून काय शेयर करतो ह्याची सर्व नोंद ठेवली जाते .. हे सर्व काही म्हणजेच 'माझे फेसबुक जीवन' ...ह्यावर जसा वेळ होईल तसे लिहण्याचा प्रयत्न करेल

01 January 2012

●๋•●๋• नविन वर्षाचा पहिला मानाचा मुजरा आपल्या राज्यांना ... ●๋•●๋•


इतिहास नेहमीच रंगवून आणि मोठा करून सांगितला जातो असे म्हणता पण शिवरायांचे आत्ताचे किल्ले आणि गड पाहिले तर ते अंगावर अशी रोमहर्षता निर्माण करता आणि मनात एक प्रश्न चिन्ह निर्माण करता कि कसे काय हे असे जलदुर्ग आणि विशाल दुर्ग त्या समयी बांधले असतील ... काय तो काळ असेल जेव्हा असा थोर राजा आणि त्याचा प्रत्येक शब्द प्राण देऊन पेलणारे ते स्वराज्य सेवक घडले ... शिवरायांच्या कार्या पुढे इतिहासाचे शब्द पण त्यांची कमी महती सांगत असतील अशी खात्रिदायक शंका येते ... आपल्या शारीरिक मर्यादे पलिकडे कार्य घड़वनार्या महापुरुषान्चि भूमि असलेल्या ह्या देशात शिवराय हे आपले भूषण आहे ... नविन वर्षाची सुरुवात हे त्यांचा आदर्श ठेवूनच करावी हा संकल्प आहे ... ह्या जगात काही करण्याची आपली जवाबदारी सर्वाधिक आहे कारण जगाने गौरवलेल्या राजाच्या मातीत आपण पण जन्म घेतला आहे ....